सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Advt.

Advt.

गुरुवार, २८ नोव्हेंबर, २०१३

सम्राट अशोक आणि त्याचे बौद्ध धर्मांतर


-महावीर सांगलीकर 

सम्राट अशोक हा मौर्य घराण्यातील तिसरा सम्राट. तो मौर्य घराण्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य याचा नातू होता. अशोकाने शेजारच्या कलिंग देशावर आक्रमण केले. त्या युद्धात दोन्ही बाजूंचे लाखो सैनिक मारले गेले. त्यामुळे अशोकाला हिंसेचा प्रचंड तिटकारा आला आणि त्याने बौद्ध धर्म स्वीकारला असे मानले जाते.

अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला हे सांगताना तो त्या अगोदर कोणता धर्म पाळत असे हे मात्र सांगितले जात नाही. अनेकांचा असा समज होवू शकतो की त्याने हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारला. पण अशोकाच्या वेळी हिंदू नावाचा धर्मच अस्तित्वात नव्हता. मगध साम्राज्यातील त्यावेळचे धर्म म्हणजे जैन, बौद्ध, आजीवक, वैदिक वगैरे. अशोक अगोदर वैदिक असण्याचा प्रश्नच येत नाही, कारण मौर्य घराण्यातील एकाही सम्राटाने वैदिक धर्माला आपल्या वैयक्तिक जीवनात थारा दिल्याचे दिसत नाही. त्यामुळे बौद्ध धर्म स्वीकारण्याअगोदर अशोक जैन किंवा आजीवक या दोनपैकी एका धर्माचा अनुयायी होता असेच म्हणावे लागते.

पण माझे वरील मत अशोक हा राजा होवून गेला या मतावर आहे. प्रत्यक्षात अशोक नावाचा राजा होवून गेला आणि त्याने बौद्ध धर्म स्वीकारला होता याला बौद्ध साहित्याशिवाय दुसरा आधार नाही. ज्यांना अशोकाचे शिलालेख म्हंटले जाते, त्यापैकी एकाही शिलालेखात अशोक हे नाव येत नाही. त्या शिलालेखांनुसार ज्याने हे शिलालेख लिहिले त्या राजाचे नाव उपाधी म्हणून देवानाम पियं पियदस्सी असे येते. आता जो धर्म देवच मानत नाही त्या धर्माचा अनुयायी स्वत:ला 'देवानाम पियं' असे कशाला म्हणवून घेईल? तरीही जे लोक पियदस्सीलाच अशोक मानतात, त्यांनी एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की पियदस्सीच्या एकाही शिलालेखावरून तो बौद्ध होता असे सिद्ध करता येत नाही.

शिवाय अशोकाचे म्हणून मानले जाणारे सगळेच शिलालेख एकाच काळातील व एकाच व्यक्तीने लिहिलेले आहेत असे मानायला आधुनिक इतिहासकार तयार नाहीत.

समकालीन आणि नंतरच्या जैन आणि वैदिक साहित्यात, तसेच समकालीन परदेशी प्रवाशांच्या प्रवास वर्णनात अशोकाचा उल्लेख येत नाही. अशोकाची कथा सर्वात आधी अशोकवदन या दुस-या शतकात म्हणजे मानलेल्या अशोकाच्या मानलेल्या काळाच्या 500वर्षानंतर लिहिलेल्या बौद्ध ग्रंथात येते. त्यानंतर ती 4थ्या शतकातील महावंश आणि 5व्या शतकातील दीपवंश या बौद्ध ग्रंथात येते.  हे ग्रंथ समकालीन नसल्याने आणि त्यातील माहितीला बाह्य पुरावे नसल्याने त्यावर विश्वास ठेवता येत नाही.

हेही वाचा:

बौद्ध धर्मातील ब्राम्हण
ज्यांचा-त्यांचा राम आणि रामायण
भारतीयांचा इतिहासबोध

1 टिप्पणी:

shrawan deore म्हणाले...

Chandragupt Maurya was faded with Guru Chankya's Bramhanical Vaidik Dharm and accepted Jain Dharm. So Ashoka also was belonged tpo Jainism as he was a heir of chandragupt. But one quistion: Jainism is more opponent of violence than Buddhism. Then how can be it possible that by observing the violence in war, Ashoka turned to Buddhism which less opponent of violence than Jainism??? It it a myth??

Popular Posts

कृपया हे पेज लाईक करावे